Posts

गेली कित्येक शतके ह्या भारतभुमीवर शक्तीला भक्ती शिवाय पर्याय नाही,ह्याची अनुभुती येते. महाराष्ट्राची माती ही संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे ती उचलून कपाळाला जरी लावली तरी यातून भक्तीचा सुगंध दरवळतो. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या ह्रदयात लढण्याची धमक ही विश्वाला शुशोभित करणार्या संतांनी निर्माण केली हे ही सर्वांना श्रुतच आहे, अशा परमपावन वारकरी संप्रदायाची झाकी दिल्ली दरबारी झळकणे म्हणजे त्या दिल्लीचे स्वौभाग्यच म्हणावे लागेल.

Image